तीन महिन्यांची घरपट्टी माफ करा....


नगर : सध्या राज्यासह नगर शहरात सलग तीन महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून नगर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना काम नसल्यामुळे महापालिकेने सलग तीन महिन्यांची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  शहरात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वत्र कामधंदा, व्यापार व छोटे - मोठे व्यवसाय ठप्प आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांची घरपट्टी रद्द करण्यात याव, अशी मागणी कदम यांनी केली आहे. 

घरगुती नव्हे तर व्यवसायिक यांचाही घरपटीसह विविध टॅक्स रद्द करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. हे रद्द केल्याने एक प्रकारे नागरिकांना दिलासा देण्याचे कामही होईल, असे कदम यांनी निवेदनात म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post