मुंबई : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात आजपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत ही जमावबंदी असणार आहे. संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली.
या निर्बंधामुळे आता राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. जास्त क्षमतेने सभागृह, क्रीडा स्पर्धा आणि लग्न सोहळे आयोजित करता येणार नाही. उपहारगृहे थिएटर, नाट्यगृहांमध्ये केवळ एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 500 तर आयोजकांवर 50 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल.
Post a Comment