पुणे जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध... कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह पाणी देण्यास...

नगर ः कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह प्रकल्पातून पाणी देण्यास पुणे जिल्ह्यातील नेत्यांचाच विरोध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या लाभक्षेत्रातील शेतक-यांचा अधिक अंत पाहू नका. या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामास तातडीने गती देऊन वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्‍या शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाच्या मागण्यांवर आमदार विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांचे या रखडलेल्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. वर्षानुवर्षे कुकडी प्रकल्पातील डिंभे ते माणिकडोह या प्रकल्पाच्या कामास पूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गती दिली होती. 

दीडशे किमीचे काम त्याकाळात पूर्ण झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतान त्यांनीही या प्रकल्पाच्या कामास प्राधान्याने सुरुवात केली होती. मात्र आघाडी सरकारच्या काळात या कामाचे घोडे आडले कुठे असा प्रश्न उपस्थित करुन, हा प्रकल्प जाणीवपूर्वक होऊनच द्यायचा नाही, अशी भूमिका सरकारमधील एका मंत्र्यांची असल्याची टीका त्यांनी केली.


मुळातच १८०० क्युसेसने वाहणारा डावा कालवा सध्या ७५० ते ८०० क्युसेसने वाहतो. त्यामुळे या कालव्याची वहन क्षमता ४५० ने कमी झाली असल्‍याची बाब उपस्थित करतानाच यामुळेच नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

याकडे लक्ष वेधून या प्रकल्‍पासाठी वाटेल ती आर्थिक तरतूद करा. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्‍यातील शेतक-यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळू द्या अशी जोरदार मागणी आमदार विखे पाटील यांनी केली.

पारनेर तालुक्यालाही पिंपळगाव जोगाच्या माध्यमातून कालव्यांव्दारे पाणी मिळाले पाहिजे. मात्र अस्तरीकरणाचे काम न झाल्यामुळे हे पाणी मिळू शकत नाही. याकडे लक्ष वेधून यासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची तातडीने उपलब्धता करुन द्या, अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post