सहा तासात नागपूरला जाणं शक्य....

नागपूर ः नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना जलदगतीने प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर कमी झाले असून अवघ्या ६ तासांत शिर्डी गाठणं नागपूरकरांना शक्य होत आहे.


महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जात आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. 
समृद्धी महामार्गाचे उदघाटन होण्याची प्रतीक्षा अनेकांना लागली होती. आता या महामार्गावर लालपरीदेखील धावणार आहे. 

एसटी महामंडळाकडून आजपासून नागपूर – शिर्डी ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवाशांना २ बाय १ पद्धतीची ३० आसने बसण्यासाठी उपलब्ध आहे. १५ शयन आसनेदेखील आहेत. सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे.

शिर्डीसोबतच नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात आली आहे. ही बससेवा नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. या बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post