प्राथमिक शिक्षक समिती अभेद्यच राहणार... सर्वांनी संयम बाळगावा...

नगर : स्वताच्या स्वार्थासाठी संघटनेचा आणि पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा वापर करून घेतल्यावर संघटनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांची दिशाभूल करत पुन्हा काही तरी व्यक्तिगत फायद्यासाठी दुसऱ्या संघटनेत कोणी प्रवेश करत असेल तर करु द्या. 


अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती अभेद्यच राहणार असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काही दिवस संयम बाळगावा, लवकरच समितीच्या सदस्यांचा जिल्हा मेळावा घेत सर्व भूमिका स्पष्ट करू, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्य नेते रा. या. औटी व जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी केले.

शिक्षक नेते व साहित्यिक डॉ. संजय कळमकर हे रविवारी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या थोरात गटात प्रवेश करणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर औटी, धामणे यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्ह्यातील शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व समिती प्रेमी शिक्षक यांना आवाहन केले आहे. 

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात शिक्षक समिती गेल्या १०-१५ वर्षांपासून काम करत आहे. प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यात समितीचा मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे समितीत अनेकांनी प्रवेश केलेला आहे. समितीचे काम पारदर्शी व लोकशाही पद्धतीने सुरु असल्याने समितीच्या राज्य नेतृत्वाने अनेकांना संघटनेच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली. 

परंतु समितीत काम करणारे काही असंतुष्ट लोक अनेक पदे भोगल्यानंतर व स्वताच्या वैयक्तिक फायद्यासाठी समिती कार्यकर्त्यांचा वापर करून घेत होते. बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचे नेतृत्व जिल्ह्याने नाकारले त्यामुळे शिक्षकी राजकारणातून संन्यास घेण्याच्या बातम्या पेरून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. 

त्यानंतर आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याची दिशाभूल करत काही कार्यकर्त्यांचा गट बाजूला करून दुसऱ्या संघटनेची वाट धरली आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व शिक्षक समिती प्रेमींनी काही दिवस संयम बाळगावा, लवकरच समितीचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यात सर्व भूमिका स्पष्ट केली जाईल. 

तो पर्यंत कोणीही समितीच्या विरोधात भूमिका घेवू नये असे आवाहन राज्य नेते रा. या. औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांच्यासह उच्चाधिकार समितीचे नितीन काकडे, अनिल आंधळे, राज्य प्रतिनिधी सिताराम सावंत, बापू लहामटे, मिलिंद पोटे,प्रताप पवार, रघुनाथ लबडे, ईश्वर माने, संभाजी औटी, दत्ता गरुड, प्रल्हाद साळुंके, विजय महामुनी, दत्ता जाधव, संतोष भोपे, राजन ढोले, अनिल अष्टेकर, दादा चोभे, बिभीषण हराळ, जयप्रकाश साठे, श्री. घाडगे, सुखदेव मोहिते, संदीप जंगले, अशोक घालमे, ऋषिकेश गोरे, गणेश कुलांगे, सुनिल लोंढे, जालिंदर खाकाळ, बबन बनकर, विजय जाधव, दादा अकोलकर आदींनी केले आहे.  

संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्यावर आम्ही शक्य तेवढे झोकून देत काम केलेले आहे, आता आम्हाला कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. ज्या शिक्षक कार्यकर्त्यांनी आजपर्यंत समिती व मंडळासाठी योगदान दिलेले आहे. 

त्यांच्या साठी पुन्हा संघटनेची बांधणी करून नवीन लोकांकडे कारभार सोपविण्यासाठी डिसेंबर अखेर जिल्हा मेळावा घेवून त्यात सध्याच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेवून नवीन कार्यकारणी जाहीर करत तरुण पिढीकडे समिती व मंडळाचा कारभार सोपविण्यात येणार असल्याचेही रा. या. औटी व संजय धामणे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post