श्रीगोंद्यात जिल्हा परिषद निवडणुकीत फॉलोअर्स नसणार्यांना नाकाराचं...

नगर :  ज्यांच्या सोशल मीडियावर दररोज पोस्ट नाही, ट्विट नाही तसेच ज्यांना किमान 25000 फॉलोअर्स नाहीत अशांना तिकीटच मिळणार नसल्याचं  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा नियम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राबवला तर अनेकजण निवडणुकीतून बाहेरच पडतील.


नाशिक येथे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उद्घाटन ते बोलत होते.  त्यांच्या बोलमुळे अनेकांनी चांगला धसका घेतला आहे. हाच निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत श्रीगोंद्यात राबविला तर अनेकजण निवडणुकीतून बाहेर पडतील.

सध्या श्रीगोंद्यात भाजपाचे अनेकजण निवडूक लढविण्यासाठी तयार आहे.मात्र समाज माध्यमातील संपर्कात कमी आहेत. हीच परिस्थिती माजी झेडपी व पंचायत सदस्यही समाज माध्यमातून संपर्कात कमीच आहेत. ही पध्दत कमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राबविल्यास अनेकजण बाहेर पडतील. यामध्ये विद्यमान यांचाही समावेश आहे.

फारसा जनाधार नसलेल्या आप सारख्या पक्षाने पंजाबमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ता मिळवली आहे. भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यामध्ये कमी पडतात. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियावर दररोज सक्रिय राहण्याची गरज आहे, नाशिक येथील बैठकीत  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post