श्रीगोंदा ः बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील बेलवंडी गावातील सर्व गणेश मंडळे, गावातील लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी यांची गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने बेलवंडी पोलीस ठाण्यात बैठक झाली. या बैठकीत दरम्यान सर्व गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी गणेश विसर्जन मिरवणूक ही डीजे विरहित करण्याचा निर्णय घेतला.
बेलवंडीतील सर्व गणेश मंडळ, ‘एक गाव एक विसर्जन मिरवणूक डीजे विरहित’ हा उपक्रम राबविणार असल्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. एक गाव एक मिरवणुकी करिता डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य -ढोल ताशा , लेझीम , हलगी , बँड तथा टाळ मृदुंग वाजवून एक आदर्श गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त माता भगिनींना प्राधान्य देण्याचा व पारंपारिक वाद्य व पारंपारिक पोशाख परिधान करून मिरवणूक काढण्याचा निर्णय बेलवंडी गावातील गणेश मंडळांनी व ग्रामस्थांनी घेतला.
हा निर्णय घेण्याकरिता सरपंच ऋषिकेश शेलार माजी उपसरपंच उत्तम भाऊ डाके, व्यापारी पतसंस्था अध्यक्ष सोपान तात्या हिरवे, युवराज पवार, मधुकर शेलार, सर्जेराव साळवे, बबन महाराज जगताप, , अरुण साळवे, शिवशंभो लेझीम मंडळ अध्यक्षसनी शिवाजी शेलार, श्रीकृष्ण मित्र मंडळ अध्यक्ष निखिल क्षीरसागर, कानिफनाथ गणेश मंडळ अध्यक्ष सुभाष देशमुख, संघर्ष प्रतिष्ठान अध्यक्ष टिंकू हवलदार, मोरया प्रतिष्ठान अध्यक्ष सुमित शिंदे, जय हिंद प्रतिष्ठान बेलवंडी अध्यक्ष संदीप शेळके यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले. या निर्णयाचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, बेलवंडी पोलिस ठाणे यांनी स्वागत करून जिल्ह्यामध्ये बेलवंडीचा डीजे विरहित एक गाव एक मिरवणूक ‘ चा आदर्श प्रस्थापित व्हावा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment