नगर ः जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज सुरु आहे. या प्रशासक राजमध्ये काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. ही चर्चा अधिकाऱ्यांपर्यंत जाऊनही त्यावर ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून प्रशासक राज आहे. या प्रशासक राजमध्ये काही कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याची जोरदार चर्चा सध्या कर्मचाऱयांमध्ये सुरु आहे. राज्यात आघाडी सरकार सत्तेत होते, तेव्हा काहीजण वरचढ होते. सरकार बदलताच आघाडीच्या काळातील वरचढ मंडळी बाजुला पडलेली आहेत. आता ज्यांच्या जवळ लोणीचा आशिर्वाद त्यांचीच चलती आहे. अशांमुळे मात्र इमाने इतबारे कष्ट करणारे त्रस्त झालेले आहेत.
जिल्हा परिषदेत एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे. ही बदली नेमकी कशी झाली असा सवाल आता कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. ही बदली नेमकी मध्ये कशी झाली. कोणाच्या सांगण्यावरून झाली असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे मध्ये आधीमधी बदली करता येते का असा सवलाही केला जात आहे.
सध्या जिल्हा परिषदेत आपली माणसे कोण त्यांच्या सोयी कशा केल्या जातील, असा प्रकार काहींकडून सुरु असल्याची चर्चा सध्या त्या बदलीवरून सुरु झालेली आहे. त्यामुळे त्या बदलीची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्या बदलीची माहितीची काहीजण आता माहिती घेत असून यामध्ये काय गोलमाल आहे, याचा शोध घेत आहेत.
Post a Comment