नगर : भाजपाने पहिल्या टप्प्यात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना निवडणुकीतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही बदल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मतदारसंघातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. लोकसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठीसंधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनेक विकासात्मक कामे केलेली आहेत. तसेच अनेक विकासाची कामे मंजूर झालेली आहेत. परंतु पक्षांतर्गत संघर्ष गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह काही कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे भाजपातीलच काही नेत्यांनी आपल्याला संधी द्यावी अशी मागणी थेट पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. भाजपातील ही काहींनी जिल्ह्यातील ठराविक नेत्यांची नावेपुढे करत त्यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे केलेला आहे. त्यामुळे आता काय भूमिका घेतेसर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. तशाच हालचाली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नावे ही चर्चेत येत आहे. हेच अधिकारी अभ्यासू असू आहेत. त्यांना संधी दिली तर विकास शक्य आहे, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे.
सरकारी सेवेत असताना अधिकार्यांनी नागरिकांची कामे केलेली आहेत. या कामाच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांच्या मतदारसंघात जनसंपर्कही झालेला आहे. त्याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनाच पक्षाने या संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment