लोकसभेचे बिगुल वाजले....

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. 


त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. शिर्डी व अहमदनगर मतदारसंघात चोथ्या टप्पात म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे

सात टप्प्यात मतदान ः पहिला टप्पा – 19 एप्रिल,  दुसरा टप्पा – 26 एप्रिल,  तिसरा टप्पा – 7 मे, चौथा टप्पा – 13 मे,  पाचवा टप्पा – 20 मे, सहावा टप्पा – 25 मे, सातवा टप्पा – 1 जून.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल.  26 एप्रिल,  7 मे,  13 मे,  20 मे, 25 मे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post