नगर ः लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जवळपास वर्षभराने विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र ही निवडणूक होण्यास अवधी असला तरी सध्या नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख यांच्या विरोधात कोण उभे राहणार याचीच चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. नेवाशातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे हे गडाख यांना म्हणाव तशी लढत देऊ शकत नाही. त्यामुळे शिवाजी कर्डिले हेच एकमेव भाजपाचे उमेदवार राहतील, जे गडाख यांना टफफाईट देऊन निवडणुकीत विजय खेचून आणतील, अशीच चर्चा सध्या नेवासा तालुक्यात सुरु आहे.
नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. या दुफळीचा फायदा आमदार शंकरराव गडाख यांना नक्कीच होणार आहे. भाजपमधील दुफळी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. त्यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे तालुक्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यात अपयशी ठरत आहे. त्याचाच फायदा शंकरराव गडाख यांना होत आहे.
विठ्ठलराव लंघे यांच्याकडूनही तालुक्यात म्हणाव तसे पक्ष संघटन मजबूत झालेले नाही. सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्या त्यांना अयपश आलेले आहे. त्याचा फटका पक्षालाच आगामी निवडणुकांमध्ये बसणार आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून सक्षम असाच उमेदवार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा नेवासा तालुक्यातील बर्याच भागाशी संपर्क आलेला आहे. आमदारकीच्या माध्यमातून सोनई परिसरातील काही गावांमध्ये विकास कामे केलेली आङे. या सर्व गावातील लोक कर्डिले यांच्या संपर्कतही आहेत. त्यामुळे शिवाजी कर्डेिले यांनाच नेवासा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
याबाबत आता नेवासा तालुक्यातील एक शिष्टमंडळ लवकरच मुंबईला जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन कर्डिले यांनाच नेवाशातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या नेवासा तालुक्यात सुरु आहे. कर्डिले यांनी उमेदवारी केली तर भाजपाच्या वाट्याला ही जागा पुन्हा मिळू शकते. नेवासा तालुक्यातील इतर सक्षम नेतृत्व नसल्याची चर्चाही सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. विधानसभा मतदारसंघ
Post a Comment