निवडणुकीच्या धामधुमीत नगर शहरात स्वच्छतेचा बोजबारा

नगर ः आंधळ दळतयं अन् कुत्र पीठ खातयं असाच कारभार अहमदनगर महापालिकेचा सुरु आहे. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही त्याकडे मनपा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना नागरी समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेत पदाधिकारी असताना तीच अवस्था व प्रशासक असतानाही तिच अवस्था असल्याने नागरिकांमधून महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post