अहमदनगरच्या जनतेचा कौल मान्य.. पुन्हा पक्ष बांधणी करू.....

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ  कै. माजी खा सुर्यभान वहाडणे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती कै ना. स. फरांदे, कै राजाभाऊ झरकर, कै माजी खा दिलीप गांधी व असंख्य निष्ठावान, संघ विचारधारेवर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नातून बांधणी झाली होती. हा मतदारसंघ भाजपाचा गड होता. हा गड आज जरी पडला असला तरी आम्ही नव्याने पक्ष बांधणी करू, अहमदनगर लोकसभा निवडणुक समन्वयक प्रा.  भानुदास बेरड यांनी म्हटले आहे.


बेरड म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाचा मुळ निष्ठावंत कार्यकर्ता हा पूर्णपणे बाजूला पडला होता. नाराज होता. शेवटच्या टप्प्यात या सर्वांची नाराजी काढुन प्रचारात सक्रिय करण्याचा आम्ही अटोकाट प्रयत्न केला. 


या पराभवाचे आम्हाला नक्कीच चिंतन करावे लागेल. तसेच निष्ठावांना देखील बळ द्यावे लागेल.  आगामी काळात निकाला बाबत चिंतन करुन झालेल्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करु.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post