नगर ः लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातून मोनिका राजळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजळे यांनी आपल्या मतदारसंघात भरघोस विकास कामे केलेली असून पक्षाच्या उमेदवाराला आपल्या तालुक्यातून लीड देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळे आता पक्ष त्यांना मंत्री पदाची संधी देईल, अशी आशा सर्वांना लागली आहे.
त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत सर्वांनी भोगला आहे. जिल्ह्यातील सर्वत्र गटबाजी सुरु असली तरी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात मात्र असा काहीच प्रकार झालेला नाही.
मात्र इतर मतदारसंघात त्यांना लीड न भेटल्याने विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परंतु राजळे यांनी विखे यांचे उत्कृष्टपणे काम केलेले असून पक्षाची एकनिष्ठपणा ठेवलेला आहे.
या त्यांच्या कामाची दखल घेऊन आता पक्ष त्यांना आगामी काही दिवसांसाठी मंत्रीपदाची संधी देणार असल्याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. या चर्चेला आता भाजपच्या नेत्यांनी मंत्रीपद देऊन पूर्णविराम द्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
याबाबत काही कार्यकर्त्यांनी आता पक्षाच्या नेत्यांना भेटण्याच्या हालचाली सुुरु झालेल्या आहेत. वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मतदारसंघात किती कामे केलेो आहेत. कोणती प्रलंबित आहे, याची माहिती घेऊ ती प्रसिध्दीला दिली जात
आहे.
.jpeg)
Post a Comment