पारनेर ः तालुक्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी काहीजण प्रशासनाला निवेदन देऊन सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. काहींनी प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनाचे इशारे देत आहे.
जेणे करून प्रश्न सुटतील, असा उदात्त हेतून सर्वसामान्यांचा आहे. मात्र तालुक्यात काहीजण मध्यस्ती करून आपला टेंभा मिरवून घेत आहे. प्रशासनाने अशा दलालांना दूर करावे, आंदोलनकर्ते अन् सर्वसामान्य यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
पारनेर तालुक्यात रस्ते, वीज, पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी काहीजण नागरिक व सामाजिक संघटना पुढाकार घेत आहे. नागरिकांचे प्रश्न सुटावे, हीच सर्वांची अपेक्षा आहे. त्यासाठीच काहीजण प्रशासनाला आंदोलनाचे इशारे देत आहे. मात्र काहीजण सध्या पारनेर शहरात पुढारपण करीत फिरत आहेत.
ही मंडळी आंदोलनकर्त्यांना दूरध्वनी करून तुम्ही पारनेरला या आपण प्रश्न मार्गी लावू, आंदोलन करू नका, असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या काहीजण करीत आहे. तसेच प्रशासनाला मी आहे ना तुम्ही काळजी नका करू आपण आंदोलन स्थगित करायला लावू असे सांगून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यापुढे तसेच सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपुढे आपली पत वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.
मूळात नागरिकांचे प्रश्न आहे, ते सोडविण्यासाठी प्रशासन व सहकारी संस्थांचे पदाधिकारी सक्षम असताना अशा दलाल पुढे का येत आहे, याची चर्चा सध्या पारनेर तालुक्यात सुरु आहे. या दलाल रहायला तालुक्याच्या एका भागात असून ते दुसऱ्या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत असल्याची चर्चा सध्या पारनेर तालुक्यात सुरु आहे.
तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीबरोबर ते रहात आहे. लोकप्रतिनिधींपेक्षा त्यांचाच रुबाब सध्या तालुक्यात वाढत चालला आहे. लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील प्रश्न सोडविण्याऐवजी हीच मंडळी पुढे येऊन आता पुढाकार घेत आहे. त्यावरून नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment