पुणे : उन्हाचचा तडाखा वाढलेला आहे. त्यामुळे सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे. मान्सूनचे अंदमानात आगमन झाल्यानंतर चक्रीवादळे आली. पण त्याचा मान्सूनवर फारसा परिणाम झालेला नाही.
या मान्सूनची केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. येत्या दोन दिवसांत तो केरळमध्ये हजेरी लावणार आहे.
सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक असून त्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत केरळात मान्सून दाखल होईल. तर १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल.
त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment