हद्दीच्या वादात सर्वसामान्य त्रस्त... पाथर्डीतील प्रकार...


पाथर्डी : वादळाने उन्मळून पडलेले झाड गेल्या दोन महिन्यांपासून हटवले न गेल्याने अमरधाम मधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना जीव धोक्यात घालून रहावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग व पालिकेकडून परस्परांवर बोट दाखवण्यामुळे महामार्गावर झाड तसेच पडून आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या जोरदार वादळात मोठे झाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या अमरधामच्या भिंतीवर पडून आतील राहत्या घराचे नुकसान झाले. ट्रॅक्टर वर फांद्या पडून काही काळ वाहतूक बंद राहिली. 

ट्रॅक्टर मालकाने स्वखर्चाने फांद्या तोडून ट्रॅक्टर हटवले. अमरधामच्या भिंतीच्या बाहेरून झाड असल्याने पालिका म्हणते आमची जबाबदारी नाही.

राष्ट्रीय महामार्गाच्या साईट पट्टीच्या बाजूला असल्याने पडलेले झाड हटविण्याबाबत जबाबदारी झटकून महसूल विभागाच्या हद्दीत असल्याने ती त्याची जबाबदारी असल्याचे सांगितले आहे.

वनविभागाच्या हद्दीत झाड पडले नाही. आमची त्यावर मालकी नाही.  म्हणून वन विभाग दुर्लक्ष करीत आहे.

रस्त्याची गरज असलेल्या  वाहन चालकांनी फांद्या हटवून एकेरी वाहतूक योग्य रस्ता केला पण प्रशासनाचे अजूनही लक्ष गेले नाही अमरधाम मध्ये अंत्यविधीसाठी ची पूर्वतयारी स्वच्छता व देखभालीसाठी एक कुटुंब तेथे राहते. 

पत्र्याची जुनाट खोली झाड पडल्याने अर्धवट पडली. त्यावरील फांद्या हटवून संबंधित कर्मचारी तेथे राहतो. सध्या पुन्हा वादळी वारे सुरू झाली आहे .अर्धवट पडलेल्या घरात राहण्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्या पुढे पर्याय नाही.

गेल्या दोन महिन्यात या रस्त्याने प्रांताधिकारी तहसीलदार,पालिकेचे कर्मचारी आदींनी प्रवास केला.कोणीही पडलेल्या झाडाला हटविण्याचा प्रयत्न केले नाही. 

कोरोना साथ आटोक्यात आल्याने प्रमुख अधिकाऱ्यांना बदल्याचे वेध लागले आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी सेवा करून काही अधिकारी व कर्मचारी माणसाळले जाऊन कर्तव्य विसरत चालले आहेत. 

अकार्यक्षम अधिकारी व निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे सर्वसामान्य माणूस वंचित राहत असून अमरधाम मध्ये अंतिम विसावा घेण्यासाठी अत्यंत अडचणीतून लोकांना जागा शोधावी लागते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post