राहाता : साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील काही मातब्बर यांनी आपली वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे साई संस्थानच्या अध्यक्षपदी याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रक्रिया करण्यासाठी आता आघाडी सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील काही नेत्यांनी आपली वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून मनधरणी सुरू केली आहे. त्यामुळे काहींना आपलीच वर्णी लागेल अशी आशा लागलेली आहे, तसे वक्तव्यही आता काहींकडून सुरू झालेले आहे. त्यामुळे साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळ निवडीची कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विश्वस्त मंडळावर कोणाची वर्णी लागणार याविषयी जिल्ह्यात चर्चा सुरू झालेली आहे.
अखिल भारतीय क्रांती सेनेने अखिल भारतीय क्रांती सेनेने विश्वस्त मंडळात पत्रकारांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
नव्याने आताही मागणी झालेली आहे. त्यामुळे आता साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ निवडीची प्रक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. राजकीय नेत्यांबरोबर आता पत्रकारांमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment