वारीत नाही होत भेदाभेद... सर्वच असतात एक...


एम. व्ही. देशमुख

जीवनात कोठेही जा.. तेथे भेदाभेद होत असतो. एकमेकाला कमी लेखून प्रत्येकजण पुढे जात असतो. यामध्ये मग एखाद्याच्या कौटुंबिक वादाचा मुद्दा उपस्थित करून त्याला कमी लेखून काहीजण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र पंढरपूर असो की आळंदीची वारी असो यामध्ये सहभागी होणारे सर्वच वारकरी एक असतात. यामध्ये कोणीच नाही करत भेदाभेद ना स्पर्धा ना तंटा सर्वच विरून विठुराया व नामाच्या स्मरणात सर्वच कायमचं दंग असतात..

जीवनात अनेकांना कडू व वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. असा माणूस नाही की त्याला आयुष्यभर कधी दुःख झालेले नाही. फक्त सुखात संपूर्ण आयुष्य त्याने घालवलेले आहे, असा एकही माणूस शोधनही सापडणार नाही. जीवनात प्रत्येकालाच सुख-दुःखाला सामोरे जावे लागत आहे.

परंतु सध्या माणसांची वृत्ती बदलत चालली आहे. स्वतः पुढे जाण्यासाठी तो इतरांना कमी लेखून किंवा त्याच्या चुका शोधून त्या इतरांसमोर मांडून आपली वाटचाल करीत असतात. अनेकदा हे करताना काहीजण एखाद्याच्या कौटुंबिक वादाचे हात्यार करून त्याचे नामोहरण करण्याचा प्रयत्नही करत असतात. 

असे जीवनात प्रत्येकाने अनुभव घेतलेले असून काहीजणांना आलेले नसले तरी इतरांचे पाहून ते सावधही झालेले आहेत. परंतु अशा प्रसंगाला प्रत्येकालाच सामोरे जावे लागत आहे.

नोकरी, राजकारण, समाजकारण अादी प्रत्येक ठिकाणी समाजात भेदाभेद केली जात आहे. प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करून एकमेकांना कमी लेखून त्याचा मार्ग शोधत आहे. हे करताना काहीजण एकमेकांचे वाद चव्हाट्यावर आणून त्यांची प्रगती खुंटवित आहे. 

परंतु वयक्तीक वादाचे पडसाद कामावर उमठत नसले तरी त्याचे हत्यार करून असंतुष्ट लोक त्यांचे नामोहरण करून प्रगती खुटंवित असतात. असे अनेकजण आता या त्रासातून बाहेर पडून नामाच्या स्मरणात आपला वेळ घालून जीवनाच्या वाटचालीवर चालत आहे.

अशाच काहींना वारीत गेल्यानंतर आलेला अनुभव ते आपल्याच शब्दात व्यक्त करू लागलेले आहे. समाजात वावरताना अनेक कडू, गोड प्रसंग अनुभवले आहेत. भेदाभेद, लोभ, मत्सर अशा सर्वांचाच अनुभव आलेला आहे. मात्र पंढरपूर असो कीइतर कोणत्याही देवाची वारी असो त्यात भेदाभेद नसतो. सर्वच एकच वारकरी म्हणून असतात. 

वारकरी म्हणूनच प्रत्येकजण आपला प्रवास करीत असतात. देवाचे स्मरण हाच एकमेवर विचार असतो. त्यातून जीवनाचा मार्ग मिळतो, त्यामुळे एकमेकांविषयी असला आकस कमी होऊन प्रत्येकाविषयी आदर निर्माण होत असतो. 

त्यामुळे जीवनात वाटचाल करताना प्रत्येकाने वारीत सहभागी होऊन देवाचे स्मरण केल्यास एकेकांविषयी असलेले मनातील रोष कमी होऊन जीवनाची वाटचाल करण्यास मदत होऊन एकमेकातील वाद संपुष्टात येतील. प्रत्येकजण सुखी जीवन जगून आपले जीवन आनंदी घालवील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post