फक्त चार तालुक्यांचा निकाल शंभर टक्के


नगर : कोरोनामुळे यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत. मूल्यमापनावर यंदाच्या वर्षी दहावीचा निकाल तयार करून शुक्रवारी घोषीत करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील चारच तालुक्यांचा 100 टक्के निकाल लागला आहे. 

यंदाच्या वर्षीचा नगर जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील 70 हजार 589 विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. 

त्यातील  70 हजार 585 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले होते. त्यातील  26 हजार 481 विद्यार्थी विशेष श्रेणी,  30 हजार 361 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 13 हजार 116 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर  608 विद्यार्थी पास झालेले आहेत. जिल्ह्यातील एकूण 70 हजार 566 विद्यार्थी पास झालेले आहेत.

जिल्ह्यातील चार तालुक्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अकोले, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा या तालुक्यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय निकाल पुढील प्रमाणे

अकोले- 100, जामखेड - 99.95, कर्जत- 99.88, कोपरगाव- 100 टक्के, नगर- 99.98, नेवासा- 100, पारनेर 99.97, पाथर्डी- 99.95, राहाता- 99.96, राहुरी-99.95, संगमनेर- 99.95, शेवगाव- 99.97, श्रीगोंदा- 100, श्रीरामपूर 99.97.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post