नगर : पक्षात वर्षानुवर्षे प्रामाणिक पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत नव्या चेहर्यांना संधी देणार आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचा पक्ष पुनर्बांधणी व पक्ष बळकटी करण्यासाठी नुकताच नगर जिल्ह्यात दौरा झाला. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निकाळजे म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना 1990 साली झाली या पक्षात गेली बावीस वर्षापासून काम करत असून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारसरणीत पक्ष बळकटीचे काम करीत आहे.
सन 2018 मध्ये आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आपली निवड झाली. यापूर्वी पक्षामध्ये फक्त स्वार्थ आला होता.
यावेळी आपण भविष्यात राज्य विधान सभेत पद घेणार नाही असे स्पष्ट सांगितले. काम करणाऱ्यावर अन्याय होऊ नये हीच आपली कार्यपद्धती असून वर्षानुवर्षे काम करण्याचा होत असलेला अन्याय आरपीआयच्या माध्यमातून दूर करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहे. हा पक्ष आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे असेही म्हणाले.
नगर जिल्ह्यात केलेल्या दौऱ्याचा मुख्य उद्देश पक्षबांधणी, गाव तिथे शाखा व पक्ष बळकट करणे हाच आहे. स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत नगर मधील पक्षाचे काम प्रमाणिकपणे करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना तिकिट देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. असे निकाळजे म्हणाले.
रामदास आठवले यांनी 26 जुलै 2019 ला स्वतःचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) स्थापन केला. मात्र पक्ष स्थापन करताना त्यांनी नोंदणी चुकीच्या पद्धतीने केली असा आरोप करीत निकाळजे यांनी म्हटले आहे की आठवले यांच्या पक्षाचा आपल्या पक्षावर काहीही परिणाम होत नाही.
आठवले यांनी तरुण वर्गाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाकडे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांकडे तरुण वर्ग संघटित होत आहे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यात चांगले स्ट्राँग करणार आहे.आपल्या पक्षात स्वार्थ होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेत आहोत.
अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांना न्याय मिळावून देणार आहोत हा आपला निर्णय आहे. परंतु पक्षाचा निर्णय तितकाच महत्त्वाचा आहे असे निकाळजे यांनी यावेळी म्हटले आहे.
यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, मुंबई युवक अध्यक्ष अक्षय निकाळजे, दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित आव्हाड, मंगेश जाधव, दादासाहेब ओहोळ, नगर दक्षिण अध्यक्ष भाऊसाहेब पगारे, नगर उत्तर अध्यक्ष राकेश कापसे, नगर युवा अध्यक्ष रॉकी लोंढे, उत्तर महाराष्ट्र सचिव महेश सुरडकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजन ब्राह्मणे आदी उपस्थित होते.
Post a Comment