पारनेर : वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शंकरशेठ लामखडे यांचे कार्य अद्वितीय असल्याचे प्रतिपादन वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ यांनी व्यक्त केले आहे.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शंकरशेठ लामखडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ढवणवाडी येथील चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळाला चिंचेचे शंभर झाडे दिली असून चिंच झाडे लावण्याचा शुभारंभ पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आला.
रविवार (ता. चार) ला उर्वरित पाच झाडे लावून वृक्षारोपण समारोप रसाळ व ढवणवाडी येथील चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळातर्फे लामखडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करीत. त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त शंकरशेठ लामखडे, गोविंदराव लामखडे, उत्तमराव लामखडे, संतोष लामखडे, सुभाष वरखडे आदी तसेच ढवणवाडी ग्रामस्थ, चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच शंकरशेठ लामखडे मित्रमंडळ उपस्थित होते.
रसाळ म्हणाले की, शंभर चिंच झाडे देउन लामखडे यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची सामाजिक जबाबदारी घेतली आहे. यामध्ये ढवणवाडी येथील चैतन्य कानिफनाथ मित्र मंडळ व शंकरशेठ लामखडे मित्रमंडळाने वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घेऊन एक मोठे सामाजिक योगदान दिले आहे.
आज कोरोना काळात आपण सिमेंटच्या जंगलात नको तर वृक्षांच्या सावलीत राहिलो पाहिजे ही शहरवासीयांची मानसिकता आहे. कोरोनाची पहिली लाट सुरू झाली. ग्रामीण भागातील शहरात गेलेले शहरातील सर्व वैभव सोडून गावी आले. त्याचवेळी त्यांना वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यांची खऱ्या अर्थाने किंमत समजली.
नैसर्गिक ऑक्सिजन फक्त वनराईत मिळू शकतो आणी हेच खरे जिवन आहे. हे आपल्याला कोरोनाने शिकवले आहे. गेली पन्नास वर्षांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावोगाव वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याची महती सांगितली ती आज लोकांना पटली आहे.
शंकरशेठ लामखडे यांनी गेली दहा वर्षांपासून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचे काम मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केले आहे. प्रत्तेक वाढदिवशी ते यासाठी खर्च करतात हे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment