श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी आज अधीक्षक अभियंता धुमाळ यांच्याशी आमदार बबनराव पाचपुते यांनी चर्चा केली.
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी आज अधीक्षक अभियंता धुमाळ यांच्याशी आमदार बबनराव पाचपुते यांनी चर्चा केली.
धरणातच
पाणी साठा कमी असल्यामुळे सध्या कुकडीत ५०० क्युसेक्सने एवढ्या कमी दाबाने
विसर्ग चालू आहे. ते पाणी सूचनेप्रमाणे विसापूर धरणामध्ये वळवण्यात आले
आहे. धरणक्षेत्रात २८ टक्के पेक्षा कमी जलसाठा असल्यामुळे लाभक्षेत्रातील सर्व
आवर्तन पूर्ण होऊ शकत नाही. पाऊस लांबणीवर पडल्यास सदर पाणी विसापूरमध्येच चालू ठेवण्याबाबत सूचना केल्याचे पाचपुते म्हणाले.
धरणक्षेत्रात पाण्याची आवक होताच पाणी श्रीगोंद्यातील सर्व वितरीकांना
पूर्ण दाबाने सोडण्यात यावे असे पाचपुते यांनी सांगितले यास धुमाळ साहेब
यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याची आवक वाढताच सर्व वितरीकांना पुर्ण
दाबाने पाणी सोडण्यात येईल असे सांगितले..
Post a Comment