मुंबई : मागील आठवड्यात केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भात्यात वाढ केल्याची घोषणा करण्यात आली होती. ही दिवाळीच्या अगोदरच्या गोड बातमी केंद्रीय कर्मचारी खूश झालेले होते. अशी गोड बातमीची राज्य सरकारी कर्मचार्यांना लागली होती. त्यांनाही राज्य सरकारने गोड बातमी दिलेली असून महागाई भात्यात वाढ केली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. एक जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात अकरा टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. महागाई भत्ता आता 17 टक्क्यांवरुन 28 टक्के इतका झाला आहे.
एक जुलै 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला.
वाढीमध्ये एक जानेवारी 2020, एक जुलै 2020 आणि एक जानेवारी 2021 पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र एक जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत महागाई भत्याचा दर 17 टक्के इतकाचा राहणार आहे.
ही महागाई भत्ता वाढ एक ऑक्टोबर 2021 पासून रोखीने देण्यात येणार आहे. एक जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्र्यपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.
एक जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या पाच महिन्यांच्या कालावधीतील पाच टक्के थकबाकी ऑक्टोबर 2021 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णयही सात ऑक्टोबर रोजी शासनाने काढला.
चार जानेवारी 2020 अन्वये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्याचा दर एक जुलै 2019 पासून बारा टक्क्यांवरुन 17 टक्के असा सुधारित करण्यात येऊन यातील पाच महिन्यांचा पाच टक्के फरक ऑक्टोबर 2021 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
Post a Comment