नगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली दबक्या आवाजातील चर्चा आता जोरदार सुरु झाली आहे. श्रीगोंद्यातील राजकीय वर्तुळात भूकंप होणार आहे.
हा भूकंप भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेसला झटका बसणार आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जाणार याकडे सध्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय हालचाली सध्या मंदावल्याने आहेत. मात्र जिल्हा परिषदेसाठी इच्छूक असलेल्या काहींनी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष तर काहींनी पक्ष बदल करण्याचे नियोजन आखले आहे. त्यासाठी काहींनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला आहे.
निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांना मोर्चे बांधणीला वेळ मिळाला आहे. आरक्षण कोणतेही पडले तरी उमेदवार आपलाच राहिल, याचे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या गट व गण वाढणार असल्यामुळे त्याचा फायदा इच्छुकांना होणार असून निश्चित गटात संधी न मिळाल्यास गट व गण बदलून निवडणूक लढविण्याच्या हालचाली केलेल्या आहेत.
काहींनी विरोधी गटाशी प्राथमिक चर्चा केलेली आहे. यामध्ये काही सत्तेतील काही विरोधी गटातील आहेत. त्यामुळे आता कोण कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment