नगर : वीज कंपनीने बुऱ्हानगर 44 गावे पिण्याचे पाण्याचे कनेक्शन बंद केले असून ते कनेक्शन त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांना निवेदन देण्यात आले.
दादासाहेब दरेकर, हरिभाऊ कर्डिले, अनिल करांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी रभाजी सुळ, मधुकर महस्के, बाबासाहेब अमृते, जाईबाई केदारे, मंगल गवळी, विलास लोखंडे, सविता रामपानमळकर, हौसराव नवसुपे, सतीश महस्के, महेश महस्के, शब्बीर शेख, तात्याभाऊ वाघमोडे, राजू वाघमोडे, मिराबाई सुळ, मच्छिंद्र थोरात, हिराबाई मोठे आदीसह 44 गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.
गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून. उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. सध्या सणावारांचे दिवस आहेत. महिला भगिनींचे अतोनात हाल होत आहे.
तसेच गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये ग्रामस्थ प्रचंड आर्थिक अडचणी मध्ये असल्याने पाणीपट्टी वसूल होण्यास अडचण येत आहे. जेवढी पाणीपट्टी वसूल झाली आहेत.
ती आम्ही आपणास जमा करून दिलेली आहे. तसेच प्रचंड उष्णता वाढत असून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तरीदेखील पाणी उपलब्ध होत नाही.
सदरचे वीज कनेक्शन त्वरित जोडले नाही तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थ विद्युत महावितरण कार्यालयासमोर उग्र स्वरुपाचे आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वीज बिलाची थकबाकी संपूर्ण माफ करण्यात यावी व यापुढे वीज बिले रेग्युलर करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Post a Comment