अहमदनगर जिल्ह्यातून प्रदेशाध्यक्षपदासाठी यांची नावे चर्चेत...


अमर छत्तीसे

श्रीगोंदा ः राष्ट्रवादीच्य़ा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिल्यानंतर राज्यभरातून कोणाची वर्णी लागणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या पदावर महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार अशी चर्चा सध्या सुरु झालेली आहे. 

या चर्चेत सध्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले,  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड, राजेश्वरी कोठावळे आदींची नावे चर्चेत आहेत. 


रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा  दिलेला आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदी रिक्त झालेल्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडले आहे. त्यांनी आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते हे पहावं लागणार आहे. 

या रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार या विषयी सध्या चर्चा सुरु झालेली आहे. या पदावर नगर जिल्ह्यातून महिला पदाधिकार्यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

ही संधी दक्षिणेतीलच महिला पदाधिकाऱ्यांना दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तशी चर्चा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुरु झालेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा दक्षिणेत होऊ शकतो. 

त्यामुळे आता पक्षाच्या नेत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. दक्षिणेतील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केलेले आहे. त्यांना संधी दिल्यास जिल्ह्याबरोेबरच राज्यात पक्षाची बांधणी होण्यास मदत होईल.

सध्या जिल्ह्यात महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा गुंड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे यांची नावे चर्चेत आहे. 

या तीनही महिला पदाधिकार्यांनी जिल्ह्यात आपल्या पदाच्या माध्यमातून चांगले काम केलेले आहे. यामध्ये मंजुषा गुंड व राजेश्वरी कोठावळे यांनी पक्ष बांधणीचे चांगले काम केलेले आहे. त्यामुळे या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post