नगर : जिल्ह्यात सध्या सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काही सेवा सोसायट्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत.
यातील काही सोसायट्या विरोधकांनी ताब्यात घेतलेल्या आहेत तर काही सत्तार्यांना सत्ता ताब्यात ठेवण्यात यश आलेले असले तर मातब्बर मात्र पराभूत झालेले आहेत.
जिल्ह्यात सध्या सोसायटी निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या काटशहाचे राजकारण सध्या सुरु आहे.
एकाच पक्षात व एकाच गटात दोन गट पडले असून गावा-गावात राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यरोप केले जात आहे.
एकाच गटात व एकाच पक्षात फूट पडून दोन पँनल तयार झालेले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आपण कोणाला साथ द्यायची असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
काही सत्ताधार्यांना आपली सत्ता टिकविताना दमछाक झालेली आहे. सत्ता मिळाली असली तरी त्यांचे मात्र मातब्बर पराभूत झालेले आहेत. गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे.
Post a Comment