स्वाभिमानी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार..?

कोल्हापूर : भाजपाच्या नेत्यांनी अनेकदा सरकार पडणार असल्याचे भाकित केलेले आहे. हे भाकित खरे होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 


महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिले आहेत. 

माजी खासदार राजू शेट्टी सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक धोरणांना शेट्टी यांचा विरोध आहे. राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारवरही शेट्टी टीका करत आहेत. 

त्यामुळे ते कोणत्या पक्षाबरोबर जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कोणाबरोबर न जाता ते स्वताचा सवतासुभा निर्माण करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर त्याचे काय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post