मुलांच्या भविष्यासाठी पालकांकडे भरपूर वेळ...

नगर :  एप्रिलपर्यंत शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याच्या व उशिरा परीक्षा घेण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. या निर्णयाचे पालकांमधून स्वागत होत असून मुलांच्या भविष्यासाठी पालकांकडे भरपूर वेळ आहे. त्याची काळजी शिक्षकांनी न करता विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करावे अशी मागणी पालकांमधून होत आहे. 


शिक्षण विभागाने एक परीपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत. त्यावर शिक्षकांच्या काही शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

त्या शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध करताना शिक्षण विभागाचे हे परिपत्रक म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची भावना म्हटले आहे. शिक्षकांनी ज्यादा काम करून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन केले आहे. 

काही ठिकाणी परीक्षा सुरू झाल्या आहेत. पालकांनी गावी जाण्यासाठी रेल्वेचे आगाऊ आरक्षणदेखील केले आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे शाळांची परीक्षांची तयारी वाया जाणार आहे. 

पालकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. अशा परिपत्रकामुळे विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण होत आहे. 

हे जे वायफळ मुद्दे मांडून आपल्या कर्तव्यातून सुटण्याचा मार्ग वारण्यास सुरवात केली आहे. वास्तविक पहाता मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक आपले ठरवलेले सुट्टीचे नियोजन रद्द करून होणारी शुल्लक आर्थिक झळ सोसू शकतात. 

मुलाची लाखमोलाची शैक्षणिक प्रगती खुंटवून कोणताच पालक भ्रमंती करणार नाही, हे त्या शिक्षक संघटनांनी मुद्दा मांडताना विचार करायला हवा होता. पालकांच्या आर्थिक नुकसानीपेक्षा स्वत:ला उन्हाळ्यात काम करावे लागेल, हे नको म्हणून पालकांचे नाव पुढे केले जात असल्याचे पालकांमध्ये बोलले जात आहे.

ज्यांचे म्हणणे आहे की जादा तास घेऊन  विद्यार्थ्यांना घडविले आहे. त्यांचा अभ्याक्रम पूर्ण केला अशा शिक्षकांच्या शाळांची वरिष्ठ अधिकार्यामार्फत तपासणी करून सत्य बाहेर आणाले, अशी मागणी होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post