मुंबई : आमदार, खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे. मनसेच्या आमदाराने या गोष्टीला पहिला विरोध केला, असे मतं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्क येथे पार पडला. आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा मेळावा होत असल्याने मनसेने मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मेळाव्यासाठी मुंबई व उपनगरातून मोठ्या प्रमाणात मनसे सैनिक आले होते.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जोरदार आघाडी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री आमदारांना घरी देऊन कट घेण्याच्या प्रयत्नात होते काय, असे ते म्हणाले.

Post a Comment