आढळगाव स्मशानभूमीचे रुपडे पालटले...

अमर छत्तीसे

श्रीगोंदा :  आढळगाव येथे दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य व काटेरी झुडपात हरवलेल्या स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे. आमदार बबनराव पाचपुते व माजी जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांच्या प्रयत्नांमधून उपलब्ध झालेल्या पंधरा लाख रुपयांच्या निधीतून नवीन स्मशानभूमी व सुशोभिकरण झाले आहे. 


आढळगाव ग्रामपंचायतीच्या सुमारे सात लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमीच्या सुशोभिकरणात भर पडली. त्यामुळे या स्मशानभुमीचे रुप पालटले आहे. 

देवनदीच्या तीरावर असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव राऊत, जेष्ठ नेते सुभाषलाल गांधी, देवराव शिंदे, राजेश वाकडे, शहाजी वाकडे, डाॅ. अशोक वाकडे आदी ग्रामस्थांनी आमदार पाचपुते यांना निधीसाठी साकडे घातले. 

पाचपुते यांनी स्थानिक विकास निधीमधून दहा लाख तसेच जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांनी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरात स्वच्छता, नवीन शवदाहिनी तसेच विजेची सोय केल्यामुळे सुशोभिकरणास मदत झाली. स्मशानभूमीचा परिसर संरक्षक भिंत बांधून बंदिस्त करण्याची गरज असून त्यासाठी निधी मिळण्याची मागणी होत आहे. 

आमदार बबनराव पाचपुते व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचशीला गिरमकर यांनी आढळगावसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


मतदारांनी विश्वास टाकून जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी दिली. त्या संधीच्या माध्यमातून गटात सदैव विकास कामे केलेली आहेत. ही काम करताना नेहमीच आमदार बबनराव पाचपुते यांची साथ मिळालेली आहे. त्यामुळेच गटाचा विकास झालेला आज दिसत आहे. - पंचशिला गिरमकर, माजी सदस्य जिल्हा परिषद

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post