कर्मवीरांचा वारसा पुढे चालवला पाहिजे...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांची मुल शिकली पाहिजेत म्हणून रयत शिक्षण संस्था उभी केली. हाच वारसा आपणा सर्वांना पुढे चालू ठेवायचा आहे, असे प्रतिपादन कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी केले.


आढळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ प्रतिभाताई पाचपुते होत्या. 

आमदार रोहित पवार म्हणाले आज देशात एक नंबर असणारी शिक्षण संस्था म्हणून रयतचा नावलौकिक आहे. कर्मवीरांनी बहुजनांसाठी गोरगरीब वंचित घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रयत ची स्थापना केली आज हा वटवृक्ष विस्तीर्ण झाला आहे.

या वटवृक्षाला जपण्याचे काम आपण सर्वांनी करायचे आहे असे आ. पवार म्हणाले. त्याचबरोबर नगर जिल्हा हा शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम आहे हे सर्व श्रेय रयत सेवकांचे आहे व विद्यार्थांचे ही आहे

त्याचबरोबर कुकडीच्या  पाण्याबाबत बोलताना पवार म्हणाले डिंभे माणिकडोह बोगदा हा अनेक वर्षांपासून चा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे या साठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत असे शेवटी आ. पवार म्हणाले भाषणादरम्यान थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून कार्यक्रमातील मरगळ झटकुन टाकली

तर अध्यक्षीय भाषणात डॉ प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या विद्यार्थांनी विद्यार्थी दशेत पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असतात जिद्द व चिकाटी अंगात असल्यावर नक्कीच यश मिळते एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करायचे असते असे डॉ पाचपुते म्हणाल्या

यावेळी माजी आमदार राहुल जगताप. घनश्याम शेलार. आण्णासाहेब शेलार. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के. राजेंद्र म्हस्के. सुभाष गांधी अनिल  ठवाळ आदींची भाषणे झाली. 

यावेळी सरपंच उबाळे.ग्रा्मपंचायत सदस्य उत्तम राऊत. शरद जमदाडे. राजाराम काळे. चेअरमन बाळु शिंदे. दादा गव्हाणे. अंबादास चव्हाण. जालिंदर बोडखे. संदीप काळाने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी केले तर सुत्रसंचालन बापु काळे व विलास शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post