नगर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये प्रारंभिक भाग ३ मधील कलम ४ अन्वये राज्य सरकारने शेजारच्या क्षेत्र मर्यादेत शाळा स्थापन करून बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे राज्य शासनाला क्रमःप्राप्त आहे.
म्हणूनच कमी पटसंख्येचे कारण दाखवून राज्यातील कोणतीही शाळा बंद करण्यात येवू नये व सदर आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे व राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांचेकडेस निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती राज्यसंघटक राजेंद्र निमसे व ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले यांनी दिली.
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले व त्यानुसार वस्ती, तांडे, पाडे ,दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले असून कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळाचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी, वस्ती, तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात मोठे आहे.
या शाळा बंद झाल्यास मुलांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होईल. तसेच बालकांच्या शारीरिक ,मानसिक स्वास्थ्यावर व सुरक्षिततेवर परिणाम करणारा निर्णय आहे.शिक्षण हक्क कायद्याने बालकाला इयत्ता १ते ५ पर्यंत त्याच्या १ किमी व इयत्ता ६ ते ८ साठी ३ किमी परिसरात शाळा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी निश्चित केलेली आहे. हे शिक्षण हक्क कायदा २००९चे उल्लंघन करणारा निर्णय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षकांची रिक्त पदे भरतीबाबत आर्थिक कारण दाखवून असमर्थता दर्शवली आहे. शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होणार असून,शाळा व्यवस्थापनाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आर्थिक कारण दाखवून शिक्षणावरील खर्चात कोणतीही कपात करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थी संख्येअभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये व प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी शिक्षणविभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे .
कमी पटाच्या शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबविण्याबाबतचे निर्देश व्हावेत अशी मागणी जिल्हा नेते सर्जेराव राऊत , राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव , राज्य संघटक राजेंद्र निमसे , संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम , ऐक्यमंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णू बांगर , संघाचे जिल्हा सरचिटणीससुनिल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर , ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद , मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव चोभे , डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव , महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दिपाली बोलके, जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके , उज्वला घोरपडे ,संगीता निगळे ,मनीषा गोसावी , सुरेखा बळीद ,मनीषा क्षेत्रे , बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे ,दत्तात्रय परहर , प्रदिप चक्रनारायण ,राजू शहाणे,विष्णू चौधरी , संजय शेळके, सुधीर रणदिवे , मधुकर डहाळे , प्रकाश पटेकर , संदीप शेळके, दत्ता बर्गे , लाजरस कसोटे ,जनार्दन काळे, पांडुरंग देवकर , प्रविण शेळके , राहुल व्यवहारे , विशाल कुलट , अशोक दहिफळे, विनायक गोरे , आदिनाथ पोटे , संजय कांबळे ,आदिल शेख , अमोल मुरकुटे , लहू फलके ,बथुवेल हिवाळे ,सुधीर बोऱ्हाडे , राजेंद्र देशमुख ,बाळासाहेब जाधव , लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, बबन जऱ्हाड , शिवाजी शिंदे , नंदू गायकवाड , पांडुरंग झरेकर , प्रताप कदम , राजेंद्र सोनवणे ,महेश लोखंडे,उद्धव डमाळे, रविंद्र अनाप, शिवाजी नरवडे, शिवाजी माने,विलास लवांडे,शहाजी जरे, ज्ञानदेव कराड ,सुखदेव डेंगळे, दिलीप दहिफळे,संदिप भालेराव, संजय सोनवणे, सुनिल कदम, अनंता खाडे ,शिवाजी खंडागळे, अनिल शिरसाट, लक्ष्मण जटाडे, पांडुरंग आव्हाड,उल्हास बटुळे , शिवाजी माने , प्रदिप कांबळे, मच्छिंद्र देशमुख यांनी केली आहे.
Post a Comment