अमर छत्तीसे
श्रीगोंदा : मुंबईमध्ये राज्याचे मुख्य सचिव श्री मनू कुमार श्रीवास्तव साहेब यांच्या मुख्य सचिव समिती कक्षामध्ये राज्यातील ग्रामसेवक व कृषी सहायक, तलाठी यांच्या राज्य संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी महसूल सचिव नितीन करीर कृषी विभागाचे सचिव एकनाथराव डवले , ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री वळवी , मुख्य सचिव यांच्या कार्यालयातील उपसचिव राजेंद्र क्षिरसागर हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब पाटील यांनी आज आक्रमकपणे ग्रामसेवकावर होत असलेल्या अन्यायाबाबत अतिरिक्त कामाचा ताण कसा आहे.
याबाबत सविस्तर माहिती दिली. पी एम किसान योजनेमधे ग्रामसेवकांची जबाबदारी, कोविड मध्ये मयत झालेल्या ग्रामसेवकांच्या वारसांना न मिळालेले सानुग्रहअनुदान, ग्रामसेवकास तांत्रिक पदाचा दर्जा नसतानाही त्यांच्याकडून करून घेण्यात येत असलेली कामे, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दुसऱ्या कोणत्याही संवर्गाने न केलेली मदत, इतर विभागाची जर कामे आमच्याकडे देण्यात येत असतील तर ग्रामसेवकांना इतर विभागांमध्ये पदोन्नती का देत नाही.
असा प्रश्न विचारला, कामाच्या अतिरिक्त तणावामुळे महाराष्ट्र राज्यात ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्या आहेत. इतर संवर्गातील कोणी ही आत्महत्या केल्या नाहीत. ही बाब मा मुख्य सचिव यांच्या लक्षात आणून दिली. तसेच ही कामे ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी यांना संयुक्त पणे देत असाल तर ग्रामस्तरावर एकच पद करा आणि ही सर्व कामे एकच पद करील असे स्पष्ट मत व्यक्त केले.
ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजीव निकम यांनी ग्रामसेवक संवर्गावर होत असलेल्या चौकशी होत असलेल्या चौकशी व त्यामध्ये ग्रामसेवकांचे होणारे निलंबन ग्रामसेवकावर दाखल होणारे गुन्हे हा प्रश्न पोट तिडकीने समोर मांडला. या विषयासह विविध विषयावर निकम यांनी एकत्रितरित्या बाजू मांडली अध्यक्ष नितीन धामणे यांनी ग्रामसेवक संवर्गास तांत्रिक कर्मचाऱ्याचा दर्जा देणे व शैक्षणिक अहर्ता वाढवणे बाबत प्रश्न उपस्थित केले
एकत्रितरित्या ग्रामसेवक संवर्गावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्याचप्रमाणे अतिरिक्त कामाचा बोजा विविध मागण्या प्रलंबित असलेबाबत तीनही अध्यक्ष यांनी उहापोह केला. या बैठकीमध्ये ग्रामसेवकाकडे असलेले इतर विभागाच्या कामांची यादी मुख्य सचिव यांच्यासमोर मांडल्यानंतर तसेच ग्रामसेवकांच्या झालेल्या आत्महत्या, कोविड मध्ये ग्रामसेवक मयत झालेले यांच्याकुटुंबीयांना अनुदान न मिळाले बाबत ग्रामसेवकाची वेतनश्रेणी याबाबतचे प्रलंबित प्रश्न हे सर्व प्रश्न पहिल्यांदाच मुख्य सचिव यांच्यासमोर आल्याने साहेबांनी या प्रश्नावर चर्चा केली.
आज रोजी ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव उपस्थित नसल्यामुळेे ग्रामविकास विभागाचे सचिव व ग्रामसेवक संघटना यांचे समवेत मुख्य सचिव यांनी स्वतंत्र बैठक एक महिन्याच्या आत घेण्याचे जाहीर केले. बैठकीमध्ये संबंधित सर्व सचिव व विभागाचे अधिकारी यांना उपस्थित राहण्याबद्दल आदेशित करण्यात आलेले आहे.
याच ठिकाणी ग्रामसेवकांचे प्रश्न एकत्रितरीत्या सोडवण्यासाठी मी स्वतः वचनबद्ध आहे अशी माहिती श्री श्रीवास्तव यांनी या बैठकीमध्ये सांगितले. प्रधानमंत्री किसान योजनेबाबत शासन निर्णयात नमूद असले प्रमाणे केवळ मृत्यूचा दाखला व ग्रामसेवकांशी संबंधित असलेल्या बाबी फक्त ग्रामसेवकांनी कराव्यात याबाबत आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पीक कापणे प्रयोगाचे काम शेवटच्या क्षणापर्यंत रद्द करण्यात यावे यासाठी आग्रही भूमिका लावून धरली परंतू मा मुख्य सचिव यांचेविनंती नुसार पुढील बैठकी पर्यंत तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी समप्रमाणात काम करावे असे तीनही अध्यक्षांनी ठरवले. ग्रामसेवक संवर्गास अतिरिक्त काम असलेबाबतच्या चर्चा झाल्या असता उपस्थित सर्वांनीच ग्रामसेवकांना मोठ्या प्रमाणावर कामे आहेत.
हे मान्य केले या चर्चेमध्ये तीनही संघटनेचे अध्यक्ष व प्रतिनिधी यांनी आपली बाजू सर्वांसमवेत स्पष्ट केली त्याचप्रमाणे यापुढे शासनाची चर्चा व बैठका करताना तीनही संघटनांनी एकत्रितरित्या सुरुवातीला बसून एकाच विषयाचे निवेदन एकत्र देण्याचे आज तीनही संघटनेच्या अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले व एकत्रितरित्या संवर्गाचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी तिघांनीही प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आजच्या रोजी मान्य केले.
ग्रामसेवक संवर्गाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तीनही संघटनांनी एकत्रितरित्या बाजू मांडल्यामुळे आजच्या सभेमध्ये ग्रामसेवकांच्या प्रश्नांचा मुख्य सचिव यांनी सुद्धा स्वतंत्ररित्या विचार केला व त्वरित स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला प्रसिद्धी प्रमुख श्री नवनाथ आबा गोरे अहमदनगर, सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाची सहकारी पतसंस्था चेअरमन श्री रामभाऊ मिटकल, माढा तालुका सचिव श्री प्रताप गवळी भाऊसाहेब उपस्थित होते. अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ गोरे यांनी दिली.
Post a Comment