अहमदनगर जिल्हा परिषदचे आरक्षण जाहीर...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : राज्यातील ३४ जिल्हा परिषद च्या अध्यपदाचे अडीच वर्षासाठी आरक्षण काढले त्याबाबत अधिक्रुत राजपत्रात आरक्षण प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद म्हणून अहमदनगर जिल्हा परिषद ची ओळख आहे. 


या जिल्हा परिषदेची सत्ता हातात असणे हे सर्वच राजकीय पक्षांच्या द्रुष्टीने महत्त्वाचे असते. पण आता अध्यक्ष पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांचा  हिरमोड झाला आहे. 

अहमदनगर जिल्हा हा राजकीय द्रुष्टीने संवेदनशील जिल्हा आहे या जिल्ह्याच्या राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र  हे धोरण तंतोतंत पाळले जाते. निवडणुकीत अतिशय टोकाचा विरोध करुन निवडणुका जिंकल्या जातात पण सत्ता स्थापनेत एकत्र येतात हात इतिहास आहे. 

या जिल्हा परिषद चे यापूर्वी अध्यक्ष पद हे काही अपवाद वगळता प्रस्थापित नेत्यांच्या अखत्यारीत होते व आताही प्रस्थापित कुटुंबात संधी मिळेल अशी अपेक्षा होती श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे. प्रणोती जगताप या जिल्हा परिषदसाठी तयारीला लागल्या होत्या. राष्ट्रवादीने हिरवा कंदील दाखवला असता तर त्याही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असत्या. तर शेवगावमधून क्षितिज घुले, नेवाशातून उदय गडाख, राहात्यातून धनश्री विखे पाटील ही नावे चर्चेत होती

पण आता हे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. अध्यक्षपदासाठी सर्वच राजकीय पक्षातील मातब्बर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पण सर्वांनाच हा धक्का बसला आहे.

सध्या अहमदनगर जिल्ह्यावर विखे कुटुंबाचा प्रभाव दिसून येतो. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यापूर्वी मंत्री असताना त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील या अध्यक्षा होत्या. आगामी काळात खा डॉ सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील या अध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जात होत्या त्या द्रुष्टीने स्वतः खा. विखे यांनी तयारी ही सुरू केली होती पण या आरक्षणाने  किमान अडीच वर्षासाठी का होईना धनश्री विखे यांची अध्यक्षपदाची संधी हुकली आहे.

समाज माध्यमावर राजपत्र फिरत असल्यामुळे आरक्षण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. याबाबत काही वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला असता राजपत्र प्रसिध्द झालेले असून अद्याप आमच्या पर्यंत आलेले नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post