नगर : नवरात्रोत्सवाच्या काळात राज्यातील महिलांच्या सर्वांगीन आरोग्य तपासणीचा महत्वाकांक्षी प्रकल्प आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित या संकल्पने अंतर्गत २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या काळात १८ वर्षावरील सर्व मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने घरातील स्त्री आरोग्य दृष्ट्या सशक्त असेल तर पर सुरक्षित ही संकल्पना घेऊन नवरात्रोत्सवाच्या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, आदिवासी तसेच महिला व बाल विकास विभागाची मदत घेण्यात येणार आहे.
जिल्हयातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उपके तसेच अंगणवाडी केंद्रात यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ अशी शिवाराची वेळ आहे. स्त्री रोग तजासह खाजगी डॉक्टरांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
यामध्ये विशेषतः ३० वर्षावरील सर्व महिलांचे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, ग्रीव्हेचा कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब याकरीता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच १८ वर्षावरील सर्व महिलांचे उंची व वजनाचे मोजमाप, रक्तगट, हिमोग्लोबीन व इतर रक्त तपासणी करण्यात येणार आहे. कोवीड लसीकरण गरोदर मातांकरीता टी.डी.चे लसीकरण करण्यात येणार आहे. वजन वाढ, पोषण आहार, कुटुंब नियोजन पध्दती, व्यसन मुक्ती याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे.
अतिदुर्गम भागात प्रामुख्याने आदिवासी क्षेत्रात आरोग्य विभागाच्या भरारी पथकातील डॉक्टरांच्या माध्यमातुन पाइयावर तसेच वस्तीमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवातील तीन दिवस हे जास्तीत जास्त गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी चाचणीसाठी देण्यात येणार आहे.
महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचणी व तपासणी या काळात करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर समांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य समितीच्या नियोजन मंडळाची सभा 22 फेब्रुवारीला घेण्यात आली. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी करण्याचे आदेश आरोग्य, महिला व बाल कल्याण महानगरपालिका व आदिवासी विभागाला देण्यात आलेले आहे.
१८ वर्षावरील सर्व महिलांनी या अभियानामध्ये सहभाग घेऊन अभियान 100 टक्के यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.
Post a Comment