श्रीगोंदा तालुक्यात मुल पळविणारी टोळी पकडली नाही... अफवांवर विश्वास ठेवू नये...पोलिस निरीक्षक रामराव ढिकले

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील आनंदवाडी येथील एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या संशयितांना गाडीसह पकडले होते पण ते संशयित अपहरण कर्ते नव्हते व त्यांनी अपहरण केलेले नव्हते हे तपासादरम्यान सिद्ध झाले असल्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथुन एका शाळकरी मुलाचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवला अशा बातम्या समाजमाध्यमांवर आल्यावर बर्याच अफवा पसरल्या होत्या.

दरम्यान या घटनेबाबत सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता पण ज्यांना मारहाण झाली होती. त्यांच्या फिर्यादीवरून ही अज्ञात पाच ते सहा लोकांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्याचा एकत्रित तपास केल्यानंतर त्या मुलाचे अपहरण करण्यात आले नव्हते. 

तो स्वताहून चारचाकी गाडीत बसला होता पण त्या मुलाने चाकु दाखवून किडण्या काढणार असल्याचे सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पण तपासात हे अपहरण नव्हते हे स्पष्ट झाले. पण चारचाकी गाडीला नंबर नसणे, शासकीय सेवन नसताना महाराष्ट्र सरकार असा फलक लावणे, दारू पिऊन गाडी चालवणे असे गुन्हे दोन जणांवर दाखल केले आहेत. त्यामुळे मुल चोरणारी टोळी श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ढिकले यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post