जिल्हा परिषद, ग्रामपंचायत माध्यमातून वराळ यांचे विकासकामांसाठी मोठे योगदान...

निघोज : जिल्हा परिषद, ग्रामपंचायत माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील व सरपंच चित्राताई वराळ पाटील यांनी मोठी विकासकामे मार्गी लावली आहे. गेली पाच वर्षात जिल्हा परिषद माध्यमातून आळकुटी व निघोज जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असल्याचे गौरवोद्गार मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद यांनी व्यक्त केले आहे. 


जिल्हा परिषद व ग्रामपंचायत माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्था करणे या ८५ लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन बाळासाहेब महाराज वरखडे यांच्या हस्ते व मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष व कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके व ज्येष्ठ ग्रामस्थ व मार्गदर्शक शिवाजी महाराज लामखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १ ऑक्टोबरला संपन्न झाले. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात कवाद बोलत होते. यावेळी  संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब लामखडे,सरपंच चित्राताई वराळ,उपसरपंच माऊली वरखडे, माजी उपसभापती खंडू भुकन,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश लाळगे,ह.भ.प.शिवाजी महाराज लामखडे,ज्येष्ठ पत्रकार दत्ताजी उनवणे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष ईधाटे, वडनेरचे माजी सरपंच शिवा पवार, मुंबई येथील सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब कवाद, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके,ग्रामपंचायत सदस्य अविता वरखडे,शबनुर इनामदार,रुपाली गायखे,मंगेश वराळ,रावसाहेब वराळ,दत्ता घोगरे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बजरंग वराळ,भास्कर वराळ,मनोहर राऊत, सोसायटीचे मा.व्हा.चेअरमन गोरख ढवण,अनंतराव वरखडे सर,सोसायटी संचालक संतोष लामखडे,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पुशेठ लामखडे,सौ.संपदा कवाद,डॉ.प्रतीक्षा वरखडे,माजी उपसभापती भाऊसाहेब लामखडे, प्रसिद्ध ठेकेदार बाबाजीशेठ लंके, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे,बाळासाहेब कवाद,पांडुरंग  लामखडे,विठ्ठल वरखडे,उत्तम लामखडे,विठ्ठल लामखडे,सुभाष वरखडे,बाबाजी वरखडे,रामा रासकर,रमेश रासकर, शांताराम लामखडे,सदाशिव वराळ,अंकुश लामखडे,बालाजी दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष अरूनशेठ लंके, विज वितरण ठेकेदार के.डी.वराळ, गजानन ठुबे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, ठेकेदार निलेश घोडे,जालिंदर ढवण,गोविंद लामखडे,गंगा वरखडे,ठकाराम वरखडे,शांताराम लामखडे,प्रविण वराळ,अप्पा वराळ, भाजपचे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष विलासराव हारदे,कोंडीभाऊ वरखडे,भाऊसाहेब वराळ,सोसायटी सचिव रामदास भोसले,मच्छिंद्र ठुबे,रवी रणसिंग, महेश ठाणगे,पांडुरंग शेटे,मनोज लामखडे,पांडुरंग वराळ,प्रदीप वाबळे,दत्ता लामखडे,रघुनाथ रसाळ,बाळासाहेब लामखडे,राजेंद्र लामखडे,अक्षय वरखडे,प्रतीक वरखडे,बाळू वराळ,हरेश ससाणे,मंगेश सोनवणे,महेश प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल,ठेकेदार योगेश वाळुंज संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन संपर्क कार्यालयाचे व्यवस्थापक श्रीकांत पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कवाद यावेळी म्हणाले कचरा व ईतर फेक साहित्य या ठिकाणी स्मशानभूमीच्या समोरच पडत असल्याने वडनेर,लामखडे वरखडे वस्तीवर जाणाऱ्या लोकांना कायमच त्रास होत होता. गेली अनेक वर्षांपासून हा कचरा व सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी होत असताना संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हा परिषद पदाधिकारी माध्यमातून हा तालुक्यातील सर्वाधिक मोठा प्रकल्प या ठिकाणी होत आहे.


ही एक कौतुकास्पद बाब असून अशाप्रकारे ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद माध्यमातून कामांची गती वाढली असून गावातील सर्वच पुढाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कवाद यांनी व्यक्त केले आहे. सरपंच चित्राताई वराळ पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की गेली दोन वर्षात ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. 

जिल्ह्याचे पालकमंत्री आणी राज्याचे महसूल व दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून निघोज आणी परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागत आहेत. घनकचरा सांडपाणी या प्रकल्पाला सर्वांनीच पाठबळ दिले म्हणून येत्या सहा महिन्यांत ८५ लाख रुपयांचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. 

ग्रामस्थांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करुण घंटागाडीत दिल्यास आपला उद्देश लवकर सफल होणार असल्याची माहिती सरपंच वराळ यांनी दिली आहे. उपसरपंच माऊली वरखडे यावेळी म्हणाले माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांचे विकासाचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व फौंडेशनचे सर्व सदस्य यांनी गेली पाच वर्षात पुर्ण केली आहे.

ग्रामपंचायतमध्ये काम करताना सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली सर्वच प्रभागांमध्ये दोन वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. राजकारण न करता समाजकारण करण्याचे काम संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन माध्यमातून होत असून टायगर बायो फिल्टर, कंपोस्ट टॅंक चेंबर असे महत्वपूर्ण कामे यातून होणार असून त्यानंतर दिड कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागणार असून सचिन पाटील वराळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव लवकरच पाठवणार असल्याची माहिती उपसरपंच वरखडे यांनी दिली आहे . यावेळी निलेश घोडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शेवटी अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post