मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बच्चू कडू व रवी राणा यांच्या वादावर समोपचाराने तोडगा काढत पूर्णविराम देण्यात आला असल्याचे समजते.
बच्चू कडू व रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचलेला आहे. अशात हा वाद मिटवण्यासाठी रविवारी दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कडू व राणा वादावर दोन तास चर्चा करण्यात आली. या चर्चेत वादाला पूर्णविराम देण्यात आला असल्याचे समजते.
बच्चू कडू व रवी राणा यांच्या जाहीर आरोप प्रत्यारोपांमुळे युतीचे वातावरण दुषित होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांना योग्य समज देऊन युती धर्माचे पालन करण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते.
एकमेकांविरुद्ध जाहीर वाच्यता न करता शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा, असं या चर्चेत ठरलं आहे. वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास झालेल्या या मॅरेथॉन चर्चेत तोडगा निघाल्याची शक्यता आहे.
Post a Comment