शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ...

शिर्डी : एकनाथ शिंदे गटातील दहा आमदारांनी आमच्याकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे आमदार निर्णय घेणार आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.


शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर शुक्रवारपासून (ता. ४) सुरू होत आहे. त्यानिमित्त जयंत पाटील नगरला आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अण्णासाहेब शेलार आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथे होणारे ‘मंथन वेध भविष्याचा’ हे शिबिर पार पडल्यानंतर राज्यातील सरकार पडेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी केला.पाटील म्हणाले, की शिर्डी येथे काँग्रेसने शिबिर घेतले होते, त्यानंतर राज्यातील सरकार पडले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post