अमर छत्तीसे
श्रीगोंदा : गेल्या महिन्यात राज्यासह श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना आमदार बबनराव पाचपुते यांनी तहसीलदार यांना दिले.
पावसाने झालेल्या नुकसानी बाबत आज तहसील कार्यालयात सर्व पक्षीय बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे. उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली यावेळी राजेंद्र नागवडे यांनी वीजबिल माफ करण्याची मागणी केली तर घनश्याम शेलार यांनी सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी केली. या चर्चेत प्रमुख पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले पावसाने झालेल्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा राज्य सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. या पंचनाम्याच्या प्रक्रियेपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. याची शासकीय यंत्रणेने खबरदारी घ्यावी, अशा सूचना आ. पाचपुते यांनी दिल्या.
यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे, गटविकास अधिकारी राम जगताप, कृषी अधिकारी दीपक सुपेकर, संदिप नागवडे आदी उपस्थित होते.
आमदार पाचपुते हे आजारी असल्याने जास्त भाषण करत नाहीत असे असले तरी ही आजच्या बैठकीत त्यांचा आक्रमक पणा दिसून आला. संपूर्ण बैठकीत एक कार्यकर्ता मध्ये मध्ये बोलत होता. अधिकारी वर्गाचे ऐकून घेत नव्हता. हे पाचपुते यांच्या लक्षात आले.
शेवटी आमदार बोलत असताना ही तोच कार्यकर्ता मध्ये बोलला व पाचपुते आक्रमक झाले. पाचपुते म्हणाले मोठ्याने बोलून प्रश्न सुटत नसतात, अथवा मतेही जास्त पडत नसतात. त्यामुळे समोर बोलणारे काय सांगतात. हे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा, असे खडे बोल सुनावले.
Post a Comment