दोस्ती फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

वडाळा महादेव : येथील दोस्ती फाउंडेशन यांच्या वतीने चार डिसेंबरला शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते साडेचापर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले आहे.


याप्रसंगी दीप प्रज्वलन प्रतिमापूजन स्वागतगीत लोक कलावंत पै मजनूभाई शेख स्मृतिगौरव पुरस्कार वितरण सोहळा  तसेच काव्याजंली प्रमुख अतिथी सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र तसेच विविध जिल्ह्यातून नामवंत साहित्यिक लेखक कवी उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष दोस्ती फाउंडेशन रज्जाक शेख यांनी दिली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. एन. पठाण कुलगुरू नागपूर विद्यापीठ उपशिक्षण संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य उद्घाटक बाबासाहेब सौदागर चित्रपट गीतकार सिने अभिनेते कवी संमेलनाध्यक्ष, वसुंधरा शर्मा सिने अभिनेत्री ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रमुख उपस्थिती प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, उपशिक्षणाधिकारी रमजानखान पठाण,    पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,   प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे, सुभाष सोनवणे, सुनील गोसावी,  राकेश कुमार शिवदे, रामदास वाघमारे, अंजुनभाई शेख, मुक्तार भाई शाह, राजेश अलघ, दीपक चव्हाण, रज्जाक भाई शेख अध्यक्ष दोस्ती फाउंडेशन प्रसंगी कलारत्न शिक्षणरत्न समाजरत्न  साहित्यरत्न आदर्श पत्रकार आदि  पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. 

तसेच निमंत्रित कवी यांचा कवी संमेलन व सन्मान सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी साहित्यीक मिराबक्ष शेख कवी आनंदा साळवे, नितीन गायके, देविदास बुधवंत, शाहरूख शेख, बाबासाहेब पवार, पत्रकार राजेंद्र देसाई, अमीनभाई शेख, डॉ शैलेंद्र भनगे, सत्तारभाई शेख, नसिर शेख, अमोल शिंदे, गुलाब फुलमाळी, सोमनाथ चौधरी  तसेच सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत वाकचौरे व यशोदा पांढरे करणार आहेत.

1/Post a Comment/Comments

  1. बातमी प्रसिद्ध करून आपण साहित्यिकांना प्रोत्साहन दिले आहे

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post