निघोज : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहे. यापुढील काळात अशाप्रकारे विकासकामे करीत जिल्हा परिषद गटाचा विकासिभिमुख चेहरा व नावलौकिक वाढविण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ कार्यरत राहतील अशी ग्वाही सरपंच चित्राताई वराळ पाटील यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील लामखडे - वरखडे वस्तीवरील अंगणवाडी ईमारत शाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच वराळ बोलत होत्या. या अंगणवाडी इमारतीसाठी साडे आठ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर, उपसरपंच माऊली वरखडे, ग्रामपंचायत सदस्या अविताताई शंकर पाटील वरखडे, ग्रामपंचायत सदस्या शबनूर इनामदार, ग्रामपंचायत सदस्या रुपाली गायखे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, माजी सदस्य भिमराव लामखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच वराळ यावेळी म्हणाल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती माध्यमातून गेली पाच वर्षात पन्नास कोटी रुपये पेक्षा जास्त निधी खर्च झाला असून जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील व पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांनी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली कार्यरत राहून बहुसंख्य विकासकामांचा पाठपुरावा करीत मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढे सुद्धा कामे मार्गी लागणार आहेत. ग्रामपंचायत माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ८५ लाख रुपये काम सुरू झाले असून ते सहा महिन्यात पुर्ण होणार आहे.
तसेच खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून पंतप्रधान ग्राम अभियान ग्राम स्वच्छता अंतर्गत स्वच्छ पाणीपुरवठा ३० कोटी रुपयांची योजना मंजूर झाली असून लवकरच या स्वच्छ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ होणार असून या पुढील तीन वर्षांत ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण होणार असून विकासाभिमुख निघोज ही संकल्पना ग्रामपंचायत माध्यमातून गतीने राबवीणार आहे.
यासाठी ग्रुप ग्रामपंचायत निघोज सर्व पदाधिकारी, सदस्य ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांचे मोठे सहकार्य व योगदान मिळत असल्याची माहिती सरपंच वराळ यांनी दिली आहे. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य दिनेश बाबर, उपसरपंच माऊली वरखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे , ग्रामपंचात माजी सदस्य भिमराव लामखडे आदिंची भाषने झाली.
Post a Comment