दोन दिवस पावसाचे...

मुंबई : बंगालच्या उपसागरात उठलेल्या मॅन-दाँस चक्रीवादळाने तामिळनाडूला तडाखा दिल्यानंतर आता ते विरले आहे. मात्र, आता पुन्हा दुसरीकडे बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमानजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होणार आहे. 


हवामानात होत असलेल्या सातत्यपूर्ण बदलामुळे विदर्भ वगळून मुंबईसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून वाऱ्याचा दिशा आणि गती यामध्ये फरक पडला आहे. त्यामुळे अरबी समुद्र, केरळ आणि कर्नाटक किनारी वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ५५ किमी राहील. समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post