श्रीगोंदा : श्रीगोंदा पावसाळ्यात पाच महिने रोहित्र बंद राहिले. पाच महिन्यांतील वीज बिलासाठी महावितरण शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. रुपये प्रति एक हजार रुपये कृषी पंपप्रमाणे वीज बिल भरून घ्यावेत. अनाठायी सक्तीची वसुली थांबवावी मागणीसाठी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर गुरुवारी उपोषण केले.
बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, पिण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली.
लोकप्रतिनिधींना भविष्यात याची किंमत मोजावी लागणार आहे. मढेवडगाव येथील वीज उपकेंद्रामध्ये वीज बिल भरण्यासाठी शेतकरी गेले असता येथील अधिकारी प्रवीण विधाते हे शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात आहेत. हे चुकीचे आहे.
येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी. अन्यथा १२ तारखेला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आसूड मोर्चा काढणार असल्याचा इशारा नाहाटा यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी पाण्यासाठी आणि सिंगल फेज वीज सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
Post a Comment