दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार...

मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.


जुनी पेन्शन योजना लागू करा, अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी, अनुकंपा नियुक्तीवरीला मान्यता तात्काळ देण्यात यावी आदी मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. 

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचारी 13 फेब्रुवारीला मोर्चाही काढणार आहेत. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाने दिला आहे. 

शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संपामुळे मुंबई विद्यापीठातल्या परीक्षाही स्थगित करण्याची वेळ ओढावली होती. तेव्हा दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करा, अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी, अनुकंपा नियुक्तीवरीला मान्यता तात्काळ देण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरीत सुरु करा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा वर्ष योजनेचा लाभ द्या या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या आहेत?


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post