संजय राऊत यांनी आता थांबलं पाहिजे

नगर : गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेसाठी सर्वच लोक‌ प्रयत्नशील होते. त्या योजनेचे काम सुरू होत आहे. त्याचा आनंद होत आहे. आपल्याला अतिशय आनंद होत आहे, असे मत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी व्यक्त केले. 


श्रीगोंदा तालुक्यातील साकळाई योजनेसाठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उपोषण केले होते. त्यासाठी लढा दिला होता. या योजनेच्या सर्व्हेसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे. 

सय्यद म्हणाल्या की, ज्या प्रश्नासाठी आपण लढा दिला तो मार्गी लागत आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्गी लागला आहे.

सय्यद म्हणाल्या की, खासदार संजय राऊत यांनी जेव्हढी बग बग करायची होती ती सगळी झालेली आहे, आणि मला असं वाटतं की कुठेतरी  ही बग बग थांबली गेली पाहिजे. कारण आपल्या डोळ्यासमोर सगळे काही तुटलेले आपण पाहिले आहे.

तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात, आल्यानंतर तुम्ही पुन्हा तेच करताय मला असे वाटते कुठेतरी थांबा आणि आता आपल्या महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करा असे सय्यद म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post