कांदाप्रश्नावर सरकारकडून थातूरमातूर उत्तरे....

नगर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला भाजप तयार नाही. ते घाबरलेले आहे. कारण त्यांनी महाराष्ट्रात शिंदे गटाबरोबर जी युती केलेली आहे, ती महाराष्ट्रातील जनतेला रुजलेली नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी म्हटले आहे.


अहमदनगर येथे सावता परिषदेला ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, कांदा उत्पादकांचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. याबाबत विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे, मात्र  सरकारने या संदर्भात थातुरमातूर उत्तर दिलेले आहे. 

विशेष म्हणजे एक समिती नेमली जाईल, अशी त्यांनी घोषणा केली. मात्र, ही समिती स्थापन होईपर्यंत शेतकरी कांदा विकून मोकळे होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडणार नाही. 

ओबीसी समाजाची नव्याने जनगणना व्हावी मागणी आहे. समता परिषदेने सुद्धा जात निहाय जनगणना करावी अशी मागणी आहे. ही मागणी योग्य असल्याचेही ते म्हणाले. 

लोकसभा आणि विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी म्हणून तर एकत्र लढलो तर निश्चितपणे जास्ती जागा , आकड्यांमध्ये किती जागा येतील हे आता सांगता येणार नाही, असेही पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post