बऱ्हाणपूरच्या उपसरपंचपदावर मनीषा जावळे यांची बिनविरोध निवड....


चांदा : नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर गावच्या उपसरपंच पदावर सौ मनिषा अनिल जावळे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली .


उपसरपंच सुरेखा रामेश्वर खुणे यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता . त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी गावच्या सरपंच कुंदा शंकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज मासिक बैठक घेण्यात आली. 


त्यामध्ये मनीषा अनिल जावळे  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या अर्जावर सुचक म्हणून प्रकाश भानुदास चव्हाण यांची सही आहे. बिनविरोध निवड होताच फटाक्यांची गुलालाची उधळण करण्यात आली. मावळते उपसरपंच खुणे नवनिर्वाचित सरपंच जावळे यांचा उपस्थितांनी सन्मान केला. 


यावेळी माजी प्राचार्य गणपत चव्हाण,गावच्या सरपंच कुंदाताई शंकरराव चव्हाण , माजी उपसरपंच सुरेखा खुणे , ग्रा प सदस्य मोनिका तावरे, उषा चव्हाण , रंजना खोमणे , प्रकाश चव्हाण, संकेत चव्हाण , बंडू गायकवाड , तंटामुक्ती अध्यक्ष दिपक चव्हाण , सोसायटी चेअरमन सुभाष चव्हाण, माजी चेअरमन शंकरराव चव्हाण , अनिल जावळे , सागर तावरे , रामेश्वर खूणे , राजू चव्हाण , ग्रामसेवक मिसाळ यु .बी. ,नवनाथ विखे , रामकिसन तुपे , कानिफ चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

जावळे यांच्या निवडीबद्ल माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख माजी सभापती सुनिताताई गडाख , माजी जि.प . सभापती सुनील गडाख यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post